पुरग्रस्थांना मदतीचा हात!

#एक_हात_मदतीचा..! पश्चिम महाराष्ट्र व कोकणात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरातून झालेल्या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळावी यासाठी राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब, जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक अध्यक्ष मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जयहिंद युवा मंचचे अध्यक्ष मा. सत्यजीत तांबे यांनी आयोजित केलेल्या युवक काँग्रेस, एनएसयुआय, जयहिंद युवा मंच व सर्व फ्रटंल च्या वतीने संगमनेर शहरात मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या कामी संगमनेर शहरातील नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले. आज जाणताराजा मैदान येथे युवक काँग्रेस, जयहिंद लोकचळवळ, एनएसयुआय, अल्पसंख्यांक काँग्रेस, अनुसूचित जाती जमाती सेल यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी जयहिंद लोकचळवळचे संस्थापक अध्यक्ष आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात आदिंसह सर्व फ्रटंल चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. #jaihindpeoplesmovement #जयहिंद_लोकचळवळ