जयहिंद लोकचळवळ ने दत्तक घेतलेल्या संगमनेर मधील 12 गावांच्या कृषी क्षेत्रा संदर्भाने महत्वपूर्ण बैठक!

जयहिंद लोकचळवळ ने दत्तक घेतलेल्या संगमनेर मधील 12 गावांच्या कृषी क्षेत्रा संदर्भाने आज महत्वपूर्ण बैठक वनराई चे अध्यक्ष. मा.रविंद्र धारिया व जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक अध्यक्ष, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. कृषी क्षेत्रातील नवनवीन योजना, शासकीय योजना, प्रोजेक्ट कसे सुरु करता येतील जेणेकरून गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना त्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल या संदर्भाने चर्चा झाली. यावेळी वनराई चे अध्यक्ष, सर्व अधिकारी यांचा आ.डॉ.तांबे यांनी फेटा बांधून व आंब्याचे रोप देऊन सत्कार केला. यावेळी प्रामुख्याने जयहिंद लोकचळवळ चे सर्व विभागप्रमुख, सहयाद्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील सर, दत्तक घेतलेले 12 गावचे सरपंच, जयहिंदचे समन्यवक आदींसह मान्यवर उपस्थित होते. #jaihindpeoplesmovement #जयहिंद_लोकचळवळ